Manoj Jarange Patil Mumbai March Live: मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या घेऊन आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईकडे केली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना त्यांनी माझ्यासोबत येऊ नये अशी सूचना केली आहे.
निघण्यापूर्वी पुढारीशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी मी लेकराबाळांसाठी लढतो आहे. मला माझ्या जीवाची परवा नाही. त्यांच्यासाठी मी मरायला देखील तयार आहे अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी मी बोलवेन त्यावेळी या असं देखील सांगितलं. जरांगे पाटील हे गेल्या १८ दिवसांपासून उपोषणावर आहेत. त्यांचा आवाज खोल गेला असून प्रकृती देखील नाजूकच आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत देखील वाढ केली आहे. पोलीस विभागाची विशेष सुरक्षा असणार आहे. अंतरवाली ते मुंबईपर्यंत जरांगेंना विशेष सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. त
मनोज जरांगे पाटील यांनी गाडीतून जात असताना पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली. त्यांनी मी आमच्या लेकरा बाळांसाठी लढणार आहे. माझा जीव गेला तरी चालेल मात्र मी आरक्षण मिळवूनच गप्प बसणार आहे असं सांगितलं. मी बोलवतो त्यावेळी समाज बांधवांनी या असं देखील ते म्हणाले.
मुंबईकडे कूच करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी मधील महिलांनी औक्षण केलं आहे. त्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांनी हाताला धरून गाडीत बसवले.
मनोज जरांगे पाटील हे जरी मुंबईकडे निघाले असले तरी त्यांनी सरकारनं कुठंही चर्चेला यावं असं सांगत या पाच दिवसाच्या प्रवासात कधीही यावर तोडगा काढला जाऊ शकतो असे सूतोवाच देखील त्यांनी दिले.
मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आंदोलन १८ व्या दिवशी देखील सुरू ठेवलं आहे. अशातच ते मुंबईकडे कूच करणार आहेत.
मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलनाच्या परवानगीसाठी तिसरा अर्ज परवानगी अर्ज करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याच्यावर कोणता निर्णय झालेला नाही. यापूर्वी केलेले दोन अर्ज पोलिसांनी लागेच फेटाळले होते मात्र या अर्जावर विचारविनिमय सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटील हे सकाळी ११ वाजता अंतवाली सराटीमधू मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यांच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना माझ्या सोबत येऊ नका असा सल्ला दिला असून ते जालना येथून फक्त ४ गाड्यांच्या ताफ्यासह निघणार आहेत.