जालना : हैदराबाद गॅझेटमध्ये विशिष्ट गावातील नाव, आडनाव अशी नोंदच नाही. तर वंशावळ कशी जुळणार असा सवाल उपस्थित करत सध्या प्रशासनाने जाहीर केलेल्या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती किंवा प्रशिक्षण शिबीर ही हैदराबाद संस्थान मधल्या मराठ्यांची शुध्द फसणवणूक असून, मराठा समाजाला भूलविण्याचे काम मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करीत आहे. असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील यांनी केला.
शुक्रवार, दि. ४ रोजी त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी २ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयाचा अधार घेतला. ते म्हणाले, या आदेशात दुरूस्ती केली तरच मराठ्यांना न्याय मिळणार आहे. कारण, मराठा समाजाची नोंद हैदराबाद गॅझेटमध्ये आहे. त्यात मराठ्यांचा दर्जा कल्टीवेटर मध्ये होतो. तो ओबीसींच्या समकक्ष आहे. हे अगोदर सिध्द करावे लागणार आहे. त्यानंतर वंशावळ सिध्द करावी लागेल. मात्र, मंत्री विखे पाटील या उलट करत आहे. आधी माणसं घालत असून, नंतर ‘जात’ घातल्या जात आहे. हा प्रकार चुकीचा आहे.
यामुळे मराठ्यांना प्रमाणपत्र मिळणे अवघड होत आहे. शिवाय, जात समित्या बरखास्त करणे हे वक्तव्य देखील ते चुकीचे करत आहे. मराठ्यांना लाभ मिळवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोलाचे काम केले असून, कृतज्ञा म्हणून शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.