At Anwa Health Center, doctors and staff do not live at the headquarters.
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या संबंधित चोवीस तास सेवा देणे, गावखेड्यात रात्री-अपरात्री आजारी पडलेल्या रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार असतो. परंतु भोकरदन तालुक्यातील आन्वा आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासला जात आहे.
परंतु याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्यास बंधनकारक करावे, अशी मागणी रुग्णांसह नागरिकांमधून होत आहेत.
आन्वा प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव रुग्णालय आहे. मात्र, या रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी वेळेवर येत नसून रात्रीच्या वेळी एकही कर्मचारी थांबत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. तरी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रुग्णालयाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहेत.
ग्रामीण भागात असलेले आन्वा प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे परिसरातील गरीब, गरजू रुग्ण उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात ये-जा करत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील गरीब, गरजू रुग्ण उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात ये-जा करत असतात. मात्र, रात्री सात वाजल्यानंतर या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर थांबत नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहेत.
तालुक्यात सर्वत्र डासांचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे पाण्याची चवही बिघडली आहे. यामुळे सर्वच रोगांची लागण तालुक्यात झाली आहे. याकडे शासनाने गांभीयनि लक्ष देणे काळाची गरज आहे.
येथील आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तेथे असलेले कर्मचारी आरोग्य केंद्र तसेच आरोग्य उपकेंद्रात उपस्थित राहत नाहीत. रुग्णांना सरकारी औषधोपचार मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांना उपचारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यावरून आरोग्य यंत्रणेला कुणाचाही धाक नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढलेली दिसून येत आहे. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी राहणे कायद्याने बंधनकारक आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने जलजन्य आजार डोके वर काढत असतात, शिवाय शेतात सर्प दंशाचे प्रकार घडतात. खेड्यात दळणवळणाची तोकडी सुविधा पाहता रात्री-अपरात्री गरोदर महिलांना उपचार मिळणे दुरापास्त झाले असून आरोग्य केंद्राच्या इमारती निव्वळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
आरोग्य केंद्र व उपकेंद्रे अशी मोठी शासकीय यंत्रणा आहे; परंतु या ठिकाणी डॉक्टर्स निवासी राहत नाहीत तसेच कर्मचारीही निवासी राहत नाहीत.
दवाखान्यातील कामाकडे दुर्लक्ष करून आपली विविध लाभांची कामे करतात तसेच शासकीय सेवेत असणाऱ्या डॉक्टरांचेही खासगी दवाखाने आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे शासकीय दवाखान्याकडे दुर्लक्ष होते.