अब्दुल सत्तार Pudhari Photo
हिंगोली

हिंगोली : अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे आणि पशुधनाचे नुकसानीचे पंचनामे उद्यापासून

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

रविवारी (दि.1) हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतीपिकाचे तसेच पशुधनाचे नुकसान झाले आहे. तसेच काही गावामध्ये नागरिक पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले होते. त्याच्या सुटकेची कार्यवाही बचाव पथकामार्फत करण्यात आली आहे. पावसामुळे शेतीपिकाचे तसेच पशुधनाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार सोमवार (दि.2) जिल्ह्यात तहसील स्तरावरील विविध पथकांमार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT