Swabhimani Shetkari Sanghatana sugarcane conference
अणदूर: तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) सकाळी शेतकऱ्यांच्या मागण्या संबंधी व वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.परिषदेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.यावेळी हालगांच्या कडकडातात शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी आयोजक शहाजी सोमवंशी, स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पप्पू पाटील, मोसिन पटेल, धाराशिव जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तालुका अध्यक्ष दुर्वास भोजनेमकबूल मुल्ला ,गोकुळ शिंदे, युवराज नवाडे, राजाराम सुरवसे इत्यादी स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस परिषद होणार खूप मोठ्या उत्साहात पार पडली.या वेळी तुळजापूर,उमरगा व अक्कलकोट तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राजू शेट्टी यांनी विविध विषयावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर सर्व कारखान्यांना इशारा देखील दिला, की जर शेतकऱ्यांना त्रास दिला किंवा थकीत बिले ताबडतोब दिले नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल.उसाला ३४०० रुपये पहिली उचलीची मागणी राजु शेट्टी यांनी केली.तसेच सोयाबीन हमीभाव केंद्र सुरु करावे.मागील हंगामातील एफआरपी तत्काळ जमा करावा. मागील हंगामातील एफ आर पी थकविणाऱ्या साखर कारखाण्यावर एफ आर आय दाखल करावा. अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मध्ये वाढ करून प्रति हेक्टरी ५० हजार त्वरित द्यावी, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. यावेळी रविंद्र इंगळे, शहाजी सोमवंशी, विजय रणदिवे आधी मान्यवरांची भाषणे झाली.
सर्व कारखानदारांनी मागील हंगामातील थकीत ऊस बिले तात्काळ अदा करा, सर्व कारखानदाराने चालू हंगामातील एफआरपी जाहीर करा,सरसकट संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे,अतिवृष्टी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अधिकचे भरीव अनुदान मंजूर करावे, सोयाबीनची शासकीय खरेदी लवकरात लवकर सुरू करावी.