Ashadhi Wari : भक्तिरसातही खमंग फराळाचा दरवळ..,यंदाही आषाढीच्या उपवासाचा थाट राहणार न्याराच File Photo
धाराशिव

Ashadhi Wari : भक्तिरसातही खमंग फराळाचा दरवळ..,यंदाही आषाढीच्या उपवासाचा थाट राहणार न्याराच

अवघी पंढरी दुमदुमून टाकणाऱ्या आषाढी वारीचा उत्साह आपल्या शिगेला पोहोचला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Devotees consume various foods during the fast of Ashadhi

भीमाशंकर वाघमारे

धाराशिव : अवघी पंढरी दुमदुमून टाकणाऱ्या आषाढी वारीचा उत्साह आपल्या शिगेला पोहोचला आहे. विठुरायाच्या भेटीची आस घेऊन जिल्ह्यातील हजारो वारकरी पायी चालत वारीचा अविभाज्य भाग बनतात. अशावेळी मऊ शिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची आणि ओल्या नारळाचा किस, वरून लिंबाचा पिळ... अशी ही गरमागरम खिचड़ी म्हणजे प्रवासातली आणि उपवासातली ऊर्जा देणारी मेजवानी।

भगरीचा भात आणि आमटी

पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. भक्तीचा हा महासागर एकीकडे 'माऊली माऊली'च्या गजराने भारून गेला असताना आता प्रत्येक घरातील किचनला आस लागली आहे ती उपवासाची आणि त्यानिमित्त तयार केल्या जाणान्या चमचमीत काहीजण भगर भात पसंत करतात. या भातासोबत उपवासाची आंबट-गोड आमटी, जी शेंगदाण्याच्या कुटापासून आणि टोमॅटोपासून बनवलेली असते, ती स्वर्गीय अनुभव देते.

उपवासाची मिसळ

तर ही अगदी बरोबर ओळखलंत. आपण चर्चा करणार आहोत ती उपवासाच्या खमंग पदार्थांची. आषाढी एकादशीला उपवास करणान्यांची संख्या मोठी असते. घरातील एखाद, होय, तुम्ही बरोबर ऐकलंता साध्या मिसळीसारखीच पण उपवासाच्या घटकांचा वापर करून बनवलेली ही मिसळ अनेक ठिकाणी मिळते. यात बटाटपाचा कीस, रताळ्याचा चिवडा, साबुदाणा चिवडा आणि वरून शेंगदाण्याचा कुटाचा रस्सा घातला जातो.

साबुदाण्याची खिचडी

दूसरा अपवाद सोडला तर प्रत्येकाचा उपवास असतोच. त्यामुळे घरोघर पारंपरिक साबुदाण्याची खिवडी हमखास असतेच. या खिचडीचा दरबल सुटला की मग उपवास नसलेल्याच्या तोंडालाही पाणी सुटणार, म्हणून मग गृहिणीही एक वाटी रताळ्याच्या किसागासून बनवलेले घावन किंवा थालीपीठ हे पौष्टिक आणि पोट भरणारे पदार्थ आहेत. खोरच्याच्या चटणीसोबत त्यांची चर अधिकच वाढते.

बटाट्याची भाजी आणि दही

जास्तच साबुदाणा भिजायला घालत असतात. आजच्या सुना, लेकींनी नवनवीन रेसिपींचा आधार घेत घरातील सदस्यांचा उपवासाचा आनंद द्विगुणित केला आहे. येत्या रविवारी (दि. ६) याच पदार्थांच्या दरवळाने मन प्रसन्न हाेणार आहे. उकडलेल्या बटाट्याची जिरा-मिरची घालून केलेली फोडणीची भाजी आणि सोबत थंडगार दही हा अनेकांचा आवडता उपवासाचा बेत असती.

फळे आणि सुकामेवा

अर्थातच, उपवासात फळे आणि सुकामेवा हा आरोग्यासाठी उत्तम पर्याय असतो. केळी, सफरचंद, चिकू यांसारखी फळे आणि बदाम, काजू, मनुका हे प्रवासात ऊर्जा देतात.

शेंगदाण्याचे लाडू

गोड खाण्याची इच्छा झाल्यास शेंगदाण्याचे लाडू किंवा खजुराचे लाडू हे उत्तम पर्याय आहेत. हे लाडू ऊर्जा देणारे असून उपवासात शरीराची साखर पातळी राखण्यास मदत करतात.

किराणा स्वस्त.... फळे महाग

शाबू - ५० ते ५५ रुपये किलो

बारीक शाबू ६० ते ७० रुपये किलो

भगर- ९० ते १२० रुपये किलो

बटाटे ३० ते ४० रुपये किलो

हिरवी मिरची ६० ते ८० रुपये किलो

रताळे ६० ते ८० रुपये किलो

केळी ४० ते ८० रुपये डझन

ओली खजूर १२० ते २०० रुपये किलो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT