फुलंबी : तालुक्यातील गणोरी-नायगाव रस्त्यावरील तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.शेख रहीम शेख अहमद (18, रा. बायजीपुरा ) व इमान शेख इरफान शेख (17, रा. नायगाव ) हे दोघे मित्र गुरुवारी (दि.5) नायगाव तलावात पोहण्यासाठी आले होते. चप्पल, बूट व मोबाईल तलाव काठावर ठेवून ते पाण्यात उतरले. काही कळण्यापूर्वीच पाण्याचा अंदाज न आल्याने बूडून त्यांचा मृत्यू झाला.
ते घरी न आल्याने घरच्यांनी व मित्रांनी त्यांच्याशी रात्रभर अनेकदा मोबाईलवर कॉल केला. रिंग जात होती, परंतु समोरून उत्तर मिळत नसल्याने घरच्यांची चिंता वाढली. शोध घेतला असता तलावाच्या काठावर बूट, चप्पल, मोबाईल आढळून आले. संशय आल्याने फुलंबी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. शुक्रवारी (दि.6) सकाळी 9 च्या दरम्यान पोलिस तलाव काठावर पोहोचले.
अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले. शोधमोहीम राबविण्यात आली. त्यात दोघांचा शोध लागला. रुग्णवाहिकेद्वारे घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत केले.
पोलिस निरीक्षक संजय सहाने, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी वडते, उपनिरीक्षक सुग््राीव चाटे, जमादार पाचंगे, हवालदार कणसे, पुढील तपास करीत आहेत.