सिल्लोड; पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यातील कृषी सेवा केंद्राच्या गोडाऊनचे पत्रे उचकटून चोरी झाल्याची घटना आज उघडडकीस आहे. यामध्ये ५९ लाखांची रुपयांचे किटनाशक चोरी करण्यात आले आहेत. अज्ञात चोरट्यांविरुद्ध सिल्लोड शहर पोलिसांनी आज (दि. २२) दुपारी गुन्हे दाखल केले.
सिल्लोड शहरातील क्रांती कृषी सेवा केंद्राचे मालक नरेद्र आत्माराम पाटील (वय ४८ वर्ष रा. सिल्लोड) यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कृषी मालाचे गोडावून आहे. १९ फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात लोकांनी या गोडाऊनचे पत्रे उचकटून किटकनाशकांची चोरी केली. यामध्ये एकूण ५९ लाख ५२ हजार ३५४ रुपयांची चोरी झाल्याची तक्रार देण्यात आली आहे.