अपघात कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

धुळे सोलापूर महामार्गावर अपघात; तिघांचा मृत्यू

अज्ञात वाहनाने धडकेत तिघांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

दौलताबाद : धुळे सोलापूर महामार्गावर फतियाबाद गावाजवळ कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात शनिवारी (दि.०६) पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडला. हा अपघात इतका जोराचा होता यात कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातात राजू आसाराम उचित (वय ६०), अलकाबाई राजू उचित (वय ५५), अर्जुन राजू उचित (वय २५) यांचा मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, राजू उचित कुटुंबासोबत पत्नी अलकाबाई, मुलगा अर्जुन व मुलगी, जावई यांच्यासोबत कन्नड तालुक्यातील अंधानेर येथे बाळूमामा यांच्या मेंढ्यांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन करून घरी परत येत असताना त्याच्या कारने फतीयाबाद गावाजवळ ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला.

या अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस स्टेशनचे प्रभाकर पाटेकर, भरत कुमार धुमाळे, सुधीर गायकवाड, तडवी, परकाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना खाजगी रूग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून राजू उचित, अलकाबाई राजू उचित, व अर्जुन राजू उचित यांना मृत्यु घोषित केले. तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या राजू उचित यांची मुलगी व जावई यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदर घटनेची नोंद दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये नोंद घेऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ हे करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT