18 gates of Jayakwadi Dam remain open on the 16th day
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील दिवसापासून कमी अधिक मोठ्या जायकवाडी धरणात गेल्या सोळाव्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्यामुळे धरणाचे १८ दरवाजे अद्याप उघडेच आहेत. शुक्रवारी (दि.५) रात्री नऊ वाजेदरम्यान गोदावरी नदीत ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती धरण उपअभियंता मंगेश शेलार यांनी दिली.
धरणाच्या वरील भागात सतत पाऊस पडत असल्याने येथील जायकवाडीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, शुक्रवारी सायंकाळी धरण नियंत्रण कक्षात नोंद केल्याप्रमाणे वरील धरणांतून १२ हजार क्युसेक आवक सुरू होती. धरणातील पाण्याची टक्केवारी ९८.५५ नोंद झाली. मागील वर्षी याच तारखेला धरणात पाण्याची टक्केवारी ९०.८८ होती.
वरील भागातून येणारी आवक लक्षात घेऊन जायकवाडी धरणात पाण्याची टक्केवारी ९९ कायम ठेवून उपलब्ध आवक गोदावरी नदीत विसर्ग करण्याचे नियोजन सध्या पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. शुक्रवारी धरणाच्या वरील भागात व तालुक्यात पाऊस पडल्यामुळे शनिवारीही चांगल्या पद्धतीने राहील. सोळा आवक ाजे कमी जास्त प्रमाणावर उघडेच रा-हणार, अशी स्थिती आहे.
गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून जायकवाडीतून गोदावरीत विसर्ग सोडण्यात आलेला आहे. नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये पाणी शिरून शेतीचे नुकसान झालेले आहे का, याबाबतचा आढावा उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, नायव तहसीलदार राहुल बनसोडे यांनी गोदावरी नदीकाठावर असलेल्या गावांचे तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक यांच्याकडून घेतला आहे.
धरणातून मोठ्या प्रमाणावर गोदा-वरीत विसर्ग सुरू असल्याने विविध गावांच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणपतीमूर्ती गोदा-वरी नदीत विसर्जन करू नये. आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी दिल्या आहेत.