बीड, पुढारी वृत्तसेवा : कधी वीणेतुनी आलो कधी टाळातुनी आलो, तुकोबाची व्यथा घेउन तळागाळातुनी आलो..विठोबा, संपली वारी निघू का रे घरी आता? तुला ठाऊक आहे मी मुलाबाळातुनी आलो...अशा एकापेक्षा एक गझल तयार करणारे अतिशय प्रतिभाशाली कवी, लेखक आणि शिक्षक असलेल्या सतीश दराडे यांचे रविवारी (दि.8) अल्पशा आजाराने निधन झाले.
सतीश दराडे हे महाराष्ट्रसोबतच देशभरातील प्रख्यात कवी होते. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मध्यंतरी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होते. बीड येथील प्रसिद्ध डॉक्टर अनिल बारकुल यांनी उपचार त्याच्यावर उपचार केले. दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत बरीही झाली होती. मात्र त्यानंतर त्यांचा थोड्याच दिवसात निधन झाले.