राजु म्हस्के
कडा : आष्टी पंचायत समितीच्या इमारतीवर अवघ्या तीन वर्षांपूर्वी यशोदिप कॉन्ट्रक्शन ने तब्बल ३.९२ लाख रुपये खर्चून नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आली होते. मात्र पावसाळा सुरू होताच इमारतीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इमारतीच्या छतावरून सतत पाणी ठिबकत असल्याने कार्यालयीन कागदपत्रे भिजून नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना कामानिमित्त कार्यालयात थांबणे कठीण झाले असून कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की,“सार्वजनिक निधी खर्च करून सुद्धा दर्जेदार काम होत नाही. फक्त नावाला काम होऊन प्रत्यक्षात गळती थांबत नसेल तर हा निधी पाण्यातच जातो.त्यामुळे जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे”
या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली असता, तातडीने दुरुस्तीचे काम करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, वारंवार होणाऱ्या या गळतीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सार्वजनिक निधी उधळून सुद्धा दर्जेदार काम होत नसल्यास हा निधी थेट पाण्यात गेल्यामुळे अशा निष्कृत काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी,बाबू धनवडे शिवसंग्राम आष्टी..