केज: पुढारी वृत्तसेवा: माहेरी आलेल्या २९ वर्षीय महिलेचा पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. अंजली ऊर्फ ठकुबाई ज्ञानदेव दराडे (वय २९) असे त्यांचे नाव आहे. ही घटना बेलगाव (ता. केज) येथे सोमवारी दुपारी घडली. रात्री उशिरा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सारूळ (ता. वाशी) येथील अंजली ऊर्फ ठकुबाई दराडे काही दिवसांपूर्वी बेलगाव (ता. केज) येथे माहेरी आल्या आहेत. सोमवारी दुपारी ४.३० च्या सुमारास तया बेलगाव शिवारातील पाटील ग्रुपच्या सार्वजनिक विहिरीत पाय घसरून पडल्या. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, बिट जमादार राजू गुंजाळ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा गळाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. अंजली दराडे याच्या मागे दोन मुले आहेत.
हेही वाचलंत का ?