राज्यातील अनेक भागाच पुरस्थिती गंभीर Pudhari
महाराष्ट्र

Maharashtra Rain Updates |राज्यात अनेक भागात पूरस्थिती गंभीर, अलमट्टीतून सव्वातीन लाख विसर्ग सुरू

तावडे हॉटेल येथून चारचाकी व अवजड वाहनांची वाहतूक सुरू

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्याला झोडपून काढले आहे, राज्यात अनेक भागात पूरस्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान, राज्यातील घाट क्षेत्र आणि मध्य महराष्ट्रातील काही भागात आज (दि.२८) आणि उद्या (दि.२९) अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Rain Updates live)

कोल्हापूरकरांना 'अल्प' दिलासा ! पंचगंगा पाणी पातळीत इंचा-इंचाने घट 

रविवारी (दि.२८ जुलै) पहाटेपर्यंत ४७.८ इंच इतकी होती. सकाळी ६ वाजता १ इंचांनी पाणी पातळी कमी झाली. तर दुपारी १२ वाजेपर्यंत आणखी ४ इंचानी पाणी पातळीत घट झाली असून, दुपारी १२ वाजता ४७ फूट ४ इंच इतकी स्थिर झाली आहे. मागील सात दिवसांपासून सातत्याने पंचगंगेच्या पातळीत वाढ होत आहे. मात्र आज प्रथमच पंचगंगेच्या पातळीत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

तावडे हॉटेल येथून चारचाकी व अवजड वाहनांची वाहतूक सुरू

कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ तावडे हॉटेल चौकात पुलाखाली साधारणतः चार फूट पाणी असल्याने आज (रविवार) सकाळी गांधीनगर पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ता बंद केला होता. मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने व पाणी थोडे खाली आल्याने सकाळी ११ वाजता दुचाकी वगळता चारचाकी वाहने व अवजड वाहनांना एकेरी वाहतूक कोल्हापूरच्या दिशेने सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता तावडे हॉटेल येथून चारचाकी व अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू झालेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT