कोल्हापूर

रायगडवर स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा

Arun Patil

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने रायगडावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे यांच्या हस्ते नगारखान्यासमोर ध्वजारोहण झाले. यावेळी पोलिस प्रशासनासह शेकडो शिवभक्तांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली.

यानिमित्ताने संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटद्वारे 'अगणित वीरांच्या बलिदानातून 1947 साली आपला देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. या क्रांतिकारी लढ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यातून आली होती, हे हुतात्मा भगतसिंगांचे जीवनचरित्र आपल्याला सांगून जाते. 6 जून 1674 रोजी दुर्गराज रायगडावर सार्वभौम स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षे परचक्रात सापडलेल्या भारतभूमीच्या सुपुत्रांना स्वातंत्र्याचा बाणा शिकविला.

स्वराज्य व स्वातंत्र्याचे मूर्तिमंत शक्तिस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने व शिवभक्तांच्या साथीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे, ही अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे,' अशा भावना व्यक्त केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT