कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पगारदारांसाठीच्या अपघाती विमा योजनेतून पाच मृतांच्या वारसांना दीड कोटी रुपयांचे विमा सुरक्षेचे धनादेश संचालक मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . जिल्हा बँकेच्?या वतीने बँकेत पगारदार बचत खाती असलेल्या 17 हजार नोकरदारांसाठी दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगातून अवघ्या 300 रुपयांच्या हप्त्यामध्ये तीस लाखांची विमा सुरक्षा देणारी योजना सुरू केली होती. यामुळे जिल्ह्यातील शिक्षक, व्याख्याते, कारखाना कर्मचारी, बँक कर्मचारी इत्यादी पगारदार खातेदारांना या योजनेची अत्यल्प हप्त्यामध्ये ही सुविधा उपलब्?ध झाली आहे.
अपघाती मृत्यू झालेल्?या कै. दादासाहेब मोहिते (पेठ वडगाव), कै. अण्?णासाहेब कोळी (गडमुडशिंगी), कै. जोतिबा कडगावकर (चंदगड), कै. शैलजा पांडव (कुरूंदवाड), कै. श्रीकांत वडेर (सौंदलगा) यांच्?या वारसांना धनादेश देण्यात आले. यावेळी संचालक भैया माने, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर यांच्?यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.