शिरटी : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तरीही राधानगरी व कोयना धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. आज (रविवार) सकाळी शिरटी-शिरोळ मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. (Kolhapur Flood)
सध्या या पाण्यातूनच वाहतूक सुरू आहे. हे पाणी आणखी वाढल्यास महावीरनगर मार्गे कनवाड-शिरोळ रस्त्याने वाहतूक सुरू होईल. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकांनी धीर धरला असला तरी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नागरिकांच्या मनामध्ये महापुराची धास्ती कायम आहे. (Kolhapur Flood)