कोल्हापूर ः चार दिवस पावसाने विश्रांती घेतली असली, तरी नदी, नाले, ओढे अद्याप ओसंडून वाहत आहेत. शनिवारीही राजाराम बंधारा पाण्याखालीच होता. बंधार्‍यावरून वाहणार्‍या पाण्याला खळाळणार्‍या धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.  
कोल्हापूर

Kolhapur : पंचगंगेच्या पाणी पातळीत किंचित घट

चार बंधारे अद्याप पाण्याखाली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : चार दिवसांपासून पावसाने पूर्ण उघडीप घेतली आहे. पाऊस थांबताच झपाट्याने वाढलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पाणी पातळीत किंचित घट होत आहे. दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीत एक इंचाची घट झाली असून अद्याप राजाराम, रुई, इचलकरंजी, बाचणी हे चार बंधारे पाण्याखाली आहेत. शनिवारी दिवसभर पावसाची उघडीप होती.

पाऊस थांबल्याने शनिवारी शहरात दिवसभर आधूनमधून ढगाळ वातावरण व उन्हाचे चटके असे चित्र होते. दैनंदिन सरासरी कमाल तापमानात 1.8 अंशांची घट होऊन पारा 31.9 अंशांवर स्थिरावला होता. किमान तापमान 23.5 अंशांवर स्थिरावले होते. याशिवाय ढगाळ वातावरणामुळे सापेक्ष आर्द्रता 80 टक्क्यांवर होती. यामुळे दिवसभर चांगलाच उकाडा जाणवत होता. पंचगंगा नदीची पाणी पातळी शनिवारी सकाळी सात वाजता 16 फूट 6 इंचांवर होती. सकाळी दहा वाजता पातळी 16 फूट 5 इंचांवर आली व रात्री 10 वाजेपर्यंत ती 16 फूट 6 इंचांवर स्थिर होती. पुढील चार दिवस कोल्हापुरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT