चार लाखांवर रेशन कार्डधारकांना केवायसीसाठी आज एकच दिवस Pudhari File Photo
कोल्हापूर

चार लाखांवर रेशन कार्डधारकांना केवायसीसाठी आज एकच दिवस

अद्याप मुदतवाढ नाही; 80.71 टक्के कार्डधारकांची केवायसी पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : रेशन कार्डवरील मोफत धान्य नियमित सुरू राहण्यासाठी जिल्ह्यातील 4 लाखांवर कार्डधारकांना केवायसी करण्यासाठी बुधवारी एकच दिवस मिळणार आहे. केवायसीसाठी दि.30 एप्रिल ही शेवटची मुदत होती. त्याला मंगळवारी सायंकाळपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली नव्हती. यामुळे वेळेत केवायसी न झाल्यास संबंधितांचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे.

रेशन धान्य घेणार्‍यांची केवायसी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामधून संबंधितांना खरोखर या धान्याची गरज आहे का? मृत, स्थलांतरितांची नावे वगळण्यात आली आहेत का? आदी माहिती घेतली जाणार आहे. या केवायसीसाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, सध्या असलेल्या दि. 30 एप्रिलपर्यंतच्या मुदतीला वाढ देण्यात आलेली नाही. यामुळे ज्यांची केवायसी राहिली आहे, त्यांना बुधवार हा अखेरचा दिवस मिळणार आहे.

जिल्ह्यात 25 लाख 21 हजार 525 नागरिकांना रेशनवरील मोफत धान्य मिळते. यापैकी 20 लाख 35 हजार 91 जणांची दि.27 एप्रिलपर्यंत केवायसी पूर्ण झाली होती. हे प्रमाण 80.71 टक्के इतके होते. दरम्यान, दि.28 व दि.29 या कालावधीत 70-80 हजारांवरील नागरिकांची ई-केवायसी पूर्ण झाल्याची शक्यता आहे. ठरावीक दिवसांनी आकडेवारी उपलब्ध होत असली, तर सुमारे साडे तीन ते चार लाख कार्डधारकांसाठी उद्या अखेरचा दिवस मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT