कोल्हापूर

कोल्हापूर : सरवडे येथील वारकऱ्याचा लोणंद येथे रेल्वे अपघातात मृत्यू

backup backup

सरवडे; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरकडे निघालेल्या वारीतील सरवडे गावातील वारकऱ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.  आनंदा विठ्ठल व्हरकट ( वय ४९) असे या मृत वारकरी यांचे नाव आहे.

आनंदा विठ्ठल व्हरकट ( वय ४९) हे पंढरपूरला निघालेल्या पायी दिंडीत सहभागी झाले होते. वारकऱ्याचा लोणंद येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. आज (दि. १९) सकाळी सहाच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या जोरदार धडकेत आनंदा यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. वारीत ट्रक चालकाचे काम करणार्‍या या वारकर्‍याचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत असून सरवडे गावावर शोककळा पसरली आहे.

अनेक वर्षे गावातून जाणार्‍या आषाढी दिंडीत व्हरकट सहभागी व्हायचे. यावर्षी देखील सहभागी झाले होते. दिंडीत ट्रक चालवण्याची सेवा करीत होते. त्यांच्या मागे आई, तीन भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

SCROLL FOR NEXT