कुरुंदवाड : येथे वीट भट्टीत साचून राहिलेले पावसाचे पाणी. Pudhari File Photo
कोल्हापूर

कुरुंदवाड परिसरात गारांसह पाऊस

उडीद, केळी पिकांचे नुकसान; वीटभट्टी व्यावसायिकांनाही फटका

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : कुरुंदवाडसह परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गारांसह जोरदार वळीव पाऊस झाला. त्यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये उडीद, केळी पिकाचे आणि वीट भट्टी व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास साडेचारच्या दरम्यान विजा चमकण्यास सुरुवात झाली. त्यानंतर थोड्याच वेळात जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही भागांत गारांचा वर्षाव झाला. या पावसामुळे उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उडीद पीक सध्या फुलोर्‍यावर आहेत. अशा वेळी झालेल्या गारपिटीमुळे फुले गळून पडली आहेत. परिणामी, उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

वीटभट्टी व्यवसाय तेजीत असतानाच अचानक पावसाने झोडपल्याने विटांवर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी विटा फुटून खराब झाल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठेे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीटभट्टी परिसर जलमय झाल्यामुळे काम बंद ठेवावे लागले आहे. खिद्रापूर व राजापूर परिसरात या वादळी वार्‍यामुळे केळीची झाडे मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT