उमगाव येथील सावतवाडी येथील हिरगा रामा गावडे या शेतकऱ्याच्या चार म्हशी पूराच्या पाण्यातून वाहून गेल्या होत्या. या चारही म्हशींचा एका बंधाऱ्यात अडकून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.2) समोर आली आहे.
गावडे हे आपल्या चार म्हशी शुक्रवारी (दि.2) सकाळी चारण्यासाठी रानात घेऊन गेले होते. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर जवळच्या ओढ्याला पाणी आले. काही वेळात पाण्याची पातळी वाढली तसेच यामधून म्हैशी वाहून गेल्या. गरीब कुटुंबातील शेतकऱ्याच्या ४ म्हशी वाहून गेल्याने त्याचे ३ लाखांचे नुकसान झाले. प्रशासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहें.