अल्झायमर जागरुकता दिन Pudhari File Photo
कोल्हापूर

‘ती’ सध्या बरेच काही विसरतेय!

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जगभरात मृत्यूचे सहावे कारण असलेल्या अल्झायमर आजाराने गाठणार्‍यांमध्ये महिलांचे प्रमाण वाढत आहे. पुरुषांच्या तुलनेत अल्झायमर होण्याचे प्रमाण दीड टक्क्याने जास्त आहे. ऐन पन्नाशीतच विस्मरण किंवा स्मृतिभ्रंश करणार्‍या अल्झायमरने ग्रासणे यामुळे महिलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न अधोरेखित झाला आहे. यामुळे सध्या ती बरेच काही विसरतेय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

  • पुरुषांच्या तुलनेत अल्झायमरग्रस्त महिलांचे प्रमाण दीड टक्क्याने जास्त.

  • नोकरी आणि घर जबाबदार्‍या पेलताना ताणतणाव, पन्नाशीतच स्मृतिभ्रंशाचा धोका

  • आर्थिक ओढाताण, मुलांच्या भविष्याची काळजी, गरोदरपण, बाळंपण, रजोनिवृत्तीतील तक्रारी

हा विस्मृती होण्याचा आजार काही वर्षांपर्यंत वयाच्या पासष्टीनंतर व्हायचा. मात्र आता या आजाराचे टप्पे गंभीर होत आहेत. महिलांमधील हार्मोन्स बदलामुळे त्या पुरुषांपेक्षा अधिक भावनिक, संवेदनशील असल्याने या आजाराचे मूळ असलेल्या मेंदूतील पेशींचे खच्चीकरण वेगाने होते. महिलांवर कौटुंबिक जबाबदार्‍यांचे ओझे अधिक असते. याचाही परिणाम विस्मृतीच्या दिशेने होतो.

महिलांचेच प्रमाण जास्त का?

बहुविध जबाबदार्‍या पार पाडताना महिलांचा मेंदू एकाच वेळी किमान दहा गोष्टींचे व्यवस्थापन करतो. कौटुंबिक गोष्टींची पूर्वतयारी करताना विचारांची आवर्तने वाढतात. याचा थेट परिणाम मेंदूतील पेशींवर होतो. अल्झायमरची लक्षणे तीव—तेने दिसत असल्याची निरीक्षणे अल्झायमर अँड रिलेटेड डिसऑर्डर सोसायटी ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणात आढळली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT