निहाल शेख व चरण शिंदे.   Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : राजाराम तलाव परिसरात 28 किलो गांजा जप्त

दोघांना अटक; ‘एलसीबी’ची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठासमोरील राजाराम तलाव परिसरात दोघांना अटक करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तब्बल 28 किलो गांजा जप्त केला. 5 लाख 60 हजार रुपये त्याची किंमत आहे. याप्रकरणी निहाल इकबाल शेख (वय 27, रा. शिरपूर, जि. धुळे) व चरण लालासो शिंदे (32, रा. माण, जि. सातारा) यांना अटक केली. ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने गुरुवारी ही धडक कारवाई केली.

खबर्‍याकडून राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजाराम तलाव परिसरात काहीजण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे, प्रवीण पाटील, वैभव पाटील, प्रदीप पाटील, गजानन गुरव आदींनी छापा टाकला. संशयास्पद दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तीन बॅगांमध्ये गांजा आढळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT