कोकण

शिवसेनेचा आज रत्नागिरीत मेळावा

दिनेश चोरगे

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये दि. 14 रोजी होणार आहे. उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. सोमवारी होणार्‍या शिवसेनेच्या मेळाव्यानंतर शहराच्या आजुबाजूच्या किती ग्रामपंचायती शिवसेनेच्या होणार, हे स्पष्ट होणार आहे.

शहर शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होणार असून कार्यकर्ते या मेळाव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. स्थानिक पातळीवर या मेळाव्याची तयारी सुरू असून पालकमंत्री सामंत काय आदेश देणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. संध्याकाळी 5.30 वाजता मेळावा होणार असून या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार्‍या या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकणी स्वागत कमानी तसेच शिवसेनेचे झेंडे लावण्यात आल्याने वातावरण भगवेमय झाले आहे.

SCROLL FOR NEXT