एसटीचे वेळापत्रक कोलमडले; प्रवासी हैराण 
रत्नागिरी

Ratnagiri : एसटीचे वेळापत्रक कोलमडले; प्रवासी हैराण

विद्यार्थी, नोकरदार, सामान्य प्रवाशांचा संताप; शहरीसह ग्रामीण 12 हून अधिक बसेस भंगारात

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी विभागातील विविध आगाराचे एसटीचे वेळापत्रक वारंवार कोलमडतेय. त्यामुळे कित्येक फेर्‍या रद्द होत आहेत, तर बसेस वेळेवर येत नाहीत. त्यामुळे शालेय, महाविद्यालयीन, नोकरदार, सामान्य प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भाागतील 12 हून अधिक बसेस भंगारात गेल्यामुळे बसेस अपुर्‍या पडत असल्यामुळे एसटी बसेसचे वेळापत्रक वेळेवर नाही. नाईलाजास्तव वडाप, रिक्षा, मिनी बसचा आधार घेवून रत्नागिरी गाठावी लागत आहे. रत्नागिरी विभागाचे वाहतूक नियंत्रक, आगार प्रमुखांनी लक्ष देवून वेळापत्रक दुरूस्ती करावी, गाड्या वेळेत सोडाव्यात, बसेस वाढवाव्यात अशीच मागणी प्रवासी करत आहेत.

ऐन पावसाळ्या एसटीची अवस्था फार बिकट झाली आहे. पावणेचार महिन्यात कित्येक एसटी बसेस गळक्या, जुन्या झालेल्या आहेत. त्याचपरिस्थितीत एसटी बसेस रस्त्यावर धावत आहे. त्यामुळे कित्येक एसटी बसेस गळक्या असल्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळापासून एसटीचे वेळापत्रक बिघडले आहे त्यानंतर आजतगायत एसटीचे वेळापत्रक कोलमडलेलेच आहे. रत्न्ाागिरी शहरातील शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तासनतास एसटीची वाट पहावी लागत आहे. अचानक एसटी रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे शाळकरी मुलांना रिक्षाचा आधार घेवून घर, शाळा गाठावी लागत आहे.

शहरातील एसटी बसेस भंगारात गेल्यामुळे आता ग्रामीणच्या एसटी बसेसचा वापर शहरातील बससेवेसाठी वापर सुरू आहे. त्याचेही वेळापत्रक वेळेत नसल्यामुळे शाळकरी विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत. त्याच बरोबर राजापूर, लांजा, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडण्गड, संगमेश्वर या आगारातून रत्न्ाागिरीला जाण्यासाठी वेळेवर बसेस धावत नाहीत. विशेषता सकाळी, सायंकाळी आणि शाळ, महाविद्यालयीन वेळेत वेळापत्रक बिघडले आहे. त्यामुळे एसटी विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. कोणी लक्ष देता लक्ष, अशी आर्त हाक प्रवासी देत आहेत.

गणेशोत्सवानंंतर नवरात्रोत्सवात ही एसटीची बससेवा कोलमडली आहे. शनिवार, रविवारी तर बसेस कमी असल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. तासनतास एसटीची वाट पहावी लागते. लांजा, राजापूरसह इतर आगारातून रत्नागिरीत येण्यासाठी एसटी बसेस वेळेवर येत नाही. त्यामुळे एसटी विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
सागर राठोड, प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT