खेड : रत्नागिरीतील मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील भरणे नाका चारपदरी उड्डाण पुलावर रविवारी (दि.२१) मोठ्या भेगा पडल्या. त्यामुळे हा महामार्ग सायंकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
या उड्डाण पुलाचे व जोड रस्त्याचे बांधकाम सुरू असताना सुरुवातीपासूनच आक्षेप नोंदवले जात होते. या पावसाळ्यात पुलाच्या सुरक्षिततेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यातच आज (रविवारी) पूलाला तडा गेल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण होती. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी पाहणी केली. त्यानंतर पूल रहदारी सुरक्षित असल्याबाबत खात्री देत नाहीत, तोपर्यंत वाहने पुलावरून जाऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.