कोकणात 29 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड 
रत्नागिरी

Ratnagiri : कोकणात 29 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

पावसाच्या अनियमिततेमुळे कोकणात 40 ते 45 टक्केच भात लावणी

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकणात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील शेतकर्‍यांकडून खरीप पेरण्या अंतिम टप्प्यावर आल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 28 हजार 863.95 हेक्टर क्षेत्रावर भात पुनर्रलागवड करण्यात आले आहे. उर्वरित भात लागवडीसाठी शेतकर्‍यांकडून मोठी लगबग सुरू आहे.

कोकणात यंदा मान्सून पूर्व पाऊस आठ दिवस आधीच आला मात्र धो धो पाऊस झाला. त्यामुळे मोठे नुकसान झाले होते. शेतकर्‍यांनी मान्सूनला सुरूवात झाली या अपेक्षेने खरीपपूर्व कामे मे मध्ये केली. शेतमळ्यांची साफसफाई करणे, पुनर्रलागवड करणार्‍या जागांची सफाई,शेतात नांगरणी करून घेतली. मान्सूचा पाऊस दमदार झाल्यानंतर खरीप पेरण्यास सुरुवात झाली. दरम्यान, यंदा जिल्ह्यातील भात व नाचणी पिकाचे लक्ष्यां 52 हजार 522 हेक्टर क्षेत्रावर असून आतापर्यंत 28 हजार 863.95 हेक्टर क्षेत्रावर पुनर्रलागवड झाली आहे. दरम्यान, जुलै महिन्यात 50 टक्के लागवड होण्याचे अपेक्षित होते मात्र अनियमित पावसामुळे भात पुनर्रलागवड कमी झाल्याचे सांगण्यात आले. यावर्षी भात लावण्यांची कामे पूर्ण होण्यास दहा दिवसांचा विलंब होईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 28 हजार हेक्टरवर खरीप हंगाम पुनर्रंलागवड झेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित पेरण्यासाठी शेतकर्‍यांकडून लगबग सुरू आहे. या महिन्यात पेरण्या पूर्ण होतील.
शिवकुमार सदाफूले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT