हापूस आंबा  pudhari photo
रत्नागिरी

हापूस दर घसरले; 40 रुपये दराने आंबा खरेदी

Hapus mango price: वाशी बाजारात हापूस आंबा पेट्यांची आवक वाढल्याने दर कमी

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याचे उत्पन्न यंदा कमी असल्यामुळे बाजारात चांगला दर होता. मात्र, एप्रिल महिन्यात आंब्याची आवक वाढल्यामुळे दर घसरले आहे. परिणामी कॅनिंगसाठी किलोच्या आंब्याला सुरुवातीला चांगला दर मिळत होता हा दर कमी होऊन 40 रुपये किलोने आंबा खरेदी सुरू आहे.

यंदा सुरुवातीपासून हापूस आंब्याची उत्पादन क्षमता कमी आहे. त्यामुळे दर स्थिर राहतील, अशी शक्यता निर्माण झाली होती सुरुवातीच्या टप्प्यात आंबा उत्पादन कमी होते दुसरा टप्प्यांमध्ये आंब्याची आवक चांगलीच वाढली. वाशी बाजारात हापूस आंबा पेट्यांची आवक वाढल्याने दर कमी होऊ लागले.

सध्या पंधराशे ते दोन हजार रुपये पेटीचा दर आहे. आरंभी 60 ते 65 रुपये किलोचा दर होता परंतु दिवसेंदिवस आंब्याची आवक वाढल्यामुळे किलोच्या दरात घसरण झाली असून त्यामुळे किलो सादर सध्या 40 रुपयांपर्यंत आला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील फळबाजारात कोकणातून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. दर दिवशी सलग 10 लाखांहून अधिक किलो आंबा फळबाजारात 3 दिवसांपेक्षा सातत्याने येत आहे. पुढच्या काळात आवक वाढेल, असा अंदाज व्यापार्‍यांनी व्यक्त केला.

गेल्या 3 दिवसाहून अधिक काळ मुंबईच्या फळबाजारात 10 लाखाहून अधिक किलो आंबा कोकणातून दाखल होत आहे. सध्या त्याचा भाव सरासरी 45 हजार रुपये प्रतिक्विंटल असा नोंदवला गेला आहे.

कोकणाशिवाय अन्य ठिकाणाहून 6 हजार 645 क्विंटल आंबा दाखल झाला. देवगड, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला शिवाय मद्रास आंब्याची आवक लक्षणीय होती. बदामी आंबा आपला भाव टिकवून आहे. निलम आंबाही काही प्रमाणात बाजारात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT