रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात बुडणाऱ्या दोन पर्यटकांना तेथील जीवरक्षकांनी वाचवले. ही घटना रविवार, दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी १.४५ वा. सुमारास घडली. अंशुमन पाठक (२८) व सोनू शेख (३२, दोन्ही रा. मुंबई) अशी बुडताना वाचवण्यात आलेल्या पर्यटकांची नावे आहेत.
रविवारी संकष्टी चतुर्थी असल्याने गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. देवदर्शन आणि पर्यटनासाठी मुंबईहून आलेले अंशुमन पाठक आणि सोनू शेख हे दुपारच्या सुमारास तेथील समुद्रात अंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा करताच त्यांचा आवाज ऐकून किनारी असणारे जीवरक्षक मयुरेश देवरूखकर, अजिंक्य रामाणी, गणपतीपुळेत बुडताना २ पर्यटकांना वाचवले.
आशिष माने, उमेश माने, अनिकेत चव्हाण, अनिकेत राजवाडकर, सुलभ चाक निखिल सुर्वे आणि वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांनी समुद्रात उड्या घेत बुडणाऱ्या दोन्ही पर्यटकांना सुखरुप पाण्याबाहेर काढले. जीवरक्षकांनी वेळीच समुद्रात उड्या घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्रातील सहाय्यक पोलिस फौजदार रमेश गावीत आणि पोलिस कॉस्टेबल नीलेश गुरव यांनी घटनास्थळी धाव घेतली.