कोकण किनारपट्टी भागात गारठा वाढला file photo
रत्नागिरी

कोकण किनारपट्टी भागात गारठा वाढला

बागायतदारांची फवारणीची जुळवाजुळव सुरू; अपेक्षित थंडीच्या प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः पावसाळा ओसरल्यानंतर आता कोकण किनारपट्टी भागात गारठा वाढू लागला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किनारी पट्ट्यात गारठ्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दोन दिवसांपूर्वी अवकाळीचा झालेला शिडकावा आणि मळभाचे वातावरण आता निवळले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदर्ग जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. आंब्यासह काजू बागायतदारांनी थंडीच्या चाहुलीने आता फवारणीची जुळवाजुळव सुरू केली आहे.

दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात संध्याकाळी हलका पाऊस झाला. या पावसात सातत्य राहिल्यास आंबा आणि काजू हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने आणलेल्या अडचणीने येथील बागायतदार हैराण होता. त्यात थंडी न पडल्याने आंबा हंगाम लांबण्याचीही भीती होती. मात्र आता थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. सकाळी आणि रात्री हलका गारवा पडू लागला आहे. गेले अनेक दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने थंडीचा कालावधी लांबला होता. त्यामुळे शहरासहीत ग्रामीण भागातही उकाड्याचा प्रभाव होता. गरम हवा, आर्द्रतेमुळे होणार्‍या काहिलीमुळे नागरिक त्रस्त होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली असून, पहाटे गारवा जाणवू लागला आहे.

सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात पहाटे 28 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सकाळी ते अर्ध्या अंशाने वाढले होते. दुपारी मात्र तापमान 30 अंशांवर होते. मात्र वातावरणात हलका गरावा होता त्याला ताशी वीस ते 25 किमीने वाहणार्‍या वार्‍याचीही साथ मिळाल्याने गारवा दुपारीही सुखद वाटत होता.

नोव्हेंबरच्या अखेरीस अपेक्षित थंडी पडल्यास डिसेंबर महिन्याच्या दुसर्‍या पंधरावड्यात चांगला मोहर येईल. तो टिकविण्यासाठी फवारणीचे वेळापत्रक निश्चित करावे लागले.
राजन वाडकर,आंबा बागायतदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT