विनोद तावडे Pudhari Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

महायुतीने केलेल्या विकास कामांमुळे जनतेने पुन्हा निवडून दिले : विनोद तावडे

राज्यातील महायुतीच्या विजयाबद्दल तावडेंची प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जनतेने महायुतीला विजय मिळवून दिला आहे. त्याबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातील हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यामध्ये जे एकत्रितपणे काम केले. त्यामुळे हा विजय शक्य झाला आहे. अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष लाभाचे राजकारण या दोन्हींचा समतोल महायुतीच्या सरकारने योग्य ठेवला. त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून भरगोस मतांनी निवडून दिले आहे. अशी प्रतिक्रिया भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी दिली.

दरम्यान, निवडणुकीच्या आयोगाच्या आकडेवारीनुसार महायुतीने २१७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी २० जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, राज्यात महायुतीने सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT