सावनेर येथे बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी Pudhari Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

काँग्रेसच्या काळात कुठे होते रामराज्य ? गडकरींचा सवाल

Maharashtra Assembly News | त्‍यांनी गांधीजींच्या विचाराचे अनुकरण केले नाही

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : महात्मा गांधींनी रामराज्य आले पाहिजे, असे म्हटले होते. परंतु काँग्रेसच्या काळात कुठे होते रामराज्य? त्यांनी फक्त महात्मा गांधीजींचे नाव घेतले. मात्र त्यांच्या विचारांचे अनुकरण केले नाही सवाल भाजपचे राष्ट्रीय नेते केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला.

काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या परंपरागत सावनेर मतदारसंघात कळमेश्वर येथे भाजप उमेदवार डॉ आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. गडकरी म्हणाले, १९४७ पासून आजपर्यंत काँग्रेसने खूप घोषणा केल्या. देशाच्या भविष्याचे नुकसान केले. चुकीच्या पद्धतीने राज्य कारभार केला. स्टिलचे कारखाने टाकले, ते डुबले. विकासाच्या बाबतीत काँग्रेसचे प्राधान्यच चुकले. खऱ्या अर्थाने गाव गरीब मजदूर आणि शेतकऱ्यांच्या विकासाला, सिंचनाला, कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना, पाणी पुरवठा आणि रस्त्यांना प्राधान्य द्यायला हवे होते. मात्र, काँग्रेसने गावांकडे पूर्णत दुर्लक्ष केले.

काँग्रसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण देशातील ग्रामीण भागाला विकासापासून वंचित ठेवले. त्याचवेळी अटलजींच्या नेतृत्वातील सरकारने आणि आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिल्याचेही त्यांनी नमूद केले. देशमुख यांना संधी दिल्यास कळमेश्वर - सावनेरची बुलेट ट्रेन दुप्पट वेगाने धावेल, असा विश्वासही त्यांनी दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

काँग्रेससाठी खूप ठप्पे मारले !

काँग्रेसनेही लोकांना खूप आश्वासने दिली. पहिले लोकांनी बैलजोडीवर ठप्पे मारले. नंतर गाय-वासरूवर ठप्पे मारले. मग पंज्यावर ठप्पे मारले. पुढे काँग्रेस फुटत गेली. हिंदीतील प्रसिद्ध व्यंगकवी स्व. शरद जोशी यांनी तर काँग्रेसवर एक कविताच लिहिली होती. ते म्हणतात, ‘काँग्रेस एक आश्चर्य है… उत्तर में हारती है तो दक्षिण में जितती है… दक्षिण में हारती है तो उत्तर में जितती है… काँग्रेस एक समस्या है… समस्या ही काँग्रेस है. पुंजिपतीओं को दिलासा देती है और गरिबी हटाओ का नारा देती है’...’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT