अहमदनगर

नगर : राजुरी शिवारातील खून प्रकरणी एक जेरबंद

अमृता चौगुले

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील तरुण शेतकरी बाळकृष्ण माधव घोरपडे या 43 वर्षीय इसमाचा संशयावरून खून करून राजुरी शिवारातील विहिरीत मृतदेह टाकण्यात आला होता. याप्रकरणातील आरोपी गंगा पारखे याच्या पोलिसांनी तब्बल अडिच वर्षांनंतर मुसक्या आवळल्या.

दरम्यान, याप्रकरणी दुसरा आरोपी विलास हरिचंद्र निर्मळ दीड महिन्यापूर्वी पाण्यात पडून मयत झाल्याची माहिती पो. नि. समाधान पाटील यांनी दिली. मयत बाळकृष्ण माधव घोरपडे आपल्या पत्नीस मारहाण करीत असे. ही माहिती विलास हरिचंद्र निर्मळ यास समजली. त्याने बाळकृष्ण याचा काटा काढायचे ठरविले. (दि. 3 डिसेंबर 2019) रोजी दुपारी बाळकृष्ण यास चोरी गेलेली दुचाकी मिळाली, असे खोटे सांगत बाभळेश्वर येथे एका हॉटेलवर बोलावले.

या ठिकाणी दारू पिल्यानंतर बाळकृष्ण यास मद्यधुंद अवस्थेत विलास निर्मळ व गंगा पारखे (रा. निर्मळ पिंपरी, ता. राहाता) यांनी दुचाकीवरून राजुरी शिवारात गोल्हारवाडी रोडच्या लगत रावसाहेब दादा गोरे (रा. राजुरी, ता. राहाता) यांच्या विहिरीत बाळकृष्णला ढकलून दोघे तेथून पसार झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT