अकोले : पुढारी वृत्तसेवा : कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील अकोले-राजूर रस्त्यावर पानवा-हाळात नवीन पुलालाच भगदाड पडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच पुलावरील भगदाड ठेकेदाराने बुजविले.
अकोले शहरालगत कोल्हार घोटी राज्यमार्गावरील अकोले-राजुर रस्त्यावर पानवा-हाळात पडलेल्या खड्डयात सागर नवले तरुणाचा दुचाकी अपघात होऊन मृत्यू झाला होता. महामार्गावरील संकटाची मालिका काही केल्या कमी होत नाही. रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे. म्हणून तसेच खड्डे बुजवावे. म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ व इंदोरी ग्रामस्थांनी अनेकदा रस्ता रोको, उपोषण, खड्डयात वृक्षारोपण करून शासनात जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे.
अकोले सा. बां. विभागाचे रस्त्याच्या कामावर दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे, तर गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वी पानवा-हाळातील पुलाचे काम पूर्ण झाले होते. पण मात्र गेल्या आठवड्यात पहिलाच पाऊस पडल्याने या पुलाला भगदाड पडल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहनाचे अपघात होत होते.
'पुढारी'च्या वृत्ताची दखल घेवून उपआंभियंता महेंद्र वाकचौरे यांनी संबंधित ठेकेदाराला पाणवा-हाळात नवीन पुलाला पडलेले भगदाड बुजविण्यास सागताच संबंधित ठेकेदाराने मशनरीच्या सहाय्याने भगदाड बुजविल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.