अहमदनगर

नगर : पंचायत राजचा दौरा अखेर गुंडाळला…!

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील राजकीय घडामोडींमुळे लक्ष लागलेल्या पंचायत राज समितीचा नगर दौरा तूर्त, तरी थांबवला गेला आहे. शासनाच्या अव्वर सचिव नीला रानडे यांनी पंचायत राज दौरा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे लेखी पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे.

दि. 28 जूनपासून पंचायत राज समिती नगर दौर्‍यावर येणार होती. या समितीच्या स्वागतापासून ते आवश्यक प्रशासकीय सर्व तयारी जिल्हा परिषदेने पूर्ण केली होती. मात्र, समितीचे अध्यक्ष डॉ. संजय येरमूलकर यांच्यासह अन्य काही आमदार राजकीय घडामोडीत सहभागी आहेत. त्यामुळे 28 जूनला समिती येणार का?

याविषयी साशंकता निर्माण झाली होती. अखेर, शासनाच्या अव्वर सचिव नीला रानडे यांनी जिल्हा परिषदेला लेखी पत्र पाठवून पंचायत राज समितीचा दौरा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे या दौर्‍याबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

SCROLL FOR NEXT