अहमदनगर

नगर : टाकळीभान रस्त्यावर गटारगंगा

अमृता चौगुले

टाकळीभान, पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे संततधार पावसामुळे सर्वच प्रभागातील रस्त्यांना जणू गटारगंगेचे स्वरूप आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

मोठी बाजारपेठ असलेल्या टाकळीभान गावातील सर्वच प्रभागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने सर्व रस्ते जलमय झाले. रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

अन्न, वस्र, निवारा या जशा नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. तितकेच महत्त्वाचे रस्ते आहेत. गावातील अंतर्गत असो किंवा इतर गावांना जोडणारे गावहद्दीतून जाणारे रस्त्यांची पावसामुळे वाताहत झालेली पहावयास मिळत आहे. पावसाच्या तोंडावर सखल भागात रस्त्यावर पाणी साचते, त्या ठिकाणी योग्य नियोजन करून पाणी साचू न देणे या बाबींकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून होणे अपेक्षित आहे.

आरोग्याची समस्या..?

साठलेले पाणी जाण्याचा मार्गच नसल्याने त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होवून आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

SCROLL FOR NEXT