अहमदनगर

नगर : केंदळ येथील तरुणास जबर मारहाण

अमृता चौगुले

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावर चिखल झाल्याने गवत टाकले म्हणून अमोल डोंगरे या तरुणास काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालुक्यातील केंदळ येथे दि. 23 जुलै रोजी घडलीय.

अमोल शंकर डोंगरे (वय 32, रा. केंदळ, ता. राहुरी) या तरुणाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.23 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्यादरम्यान अमोल डोंगरे हा रोडवर चिखल झाल्याने गवत टाकत होता. तेव्हा आरोपी हे गैर कायद्याची मंडळी जमा करून आले. तेव्हा अमोल डोंगरे याने रस्त्यावर गवत टाकले, या कारणावरून काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

घटनेनंतर अमोल शंकर डोंगरे याने राहुरी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून आरोपी भागवत दाजी तारडे, नवनाथ भागवत तारडे, मच्छिंद्र भागवत तारडे, दादासाहेब रामदास तारडे, अक्षय दादासाहेब तारडे सर्व राहणार केंदळ, ता. राहुरी.
या पाच जणांवर मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महादेव शिंदे हे करीत आहेत.
या घटनेमुळे केंदळमध्ये खळबळ उडाली आहे.

SCROLL FOR NEXT