अहमदनगर

नगर-मनमाड खड्ड्यांचा आठवड्यात तिसरा बळी

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवरून घराकडे निघालेल्या औरंगाबाद येथील योगेश सहादेव सानप (वय 27) या तरूणाचा नगर -मनमाड महामार्गावरील खड्ड्याने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, राहुरी परिसरात महामार्गावरील खड्ड्यांचा हा आठवड्यात तब्बल तिसरा बळी ठरल्याने सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत खड्ड्यांमुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याने हा तरुण कडेने दुचाकी चालवित असताना अपघातात ठार झाला.

नगर- मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल अनेक वर्षांपासून नागरिकांची ओरड सुरूच आहे. राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होऊनही नगर-मनमाड रस्त्याचे दारिद्य्र कमी होईनासे झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. डॉ. सुजय विखे पा. व खा. सदाशिव लोखंडे यांनी लक्ष देऊनही परिस्थिती जैसे-थे आहे. यापूर्वी राहुरी- बारागाव नांदूर रस्त्यालगतचा तरूण अजय कारभारी बोरूडे, डिग्रस येथील मीराताई राधाकृष्ण तागड यांचा या रस्त्यावरील खड्ड्यांनी बळी घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT