अहमदनगर

अहमदनगर : उड्डाणपुलावरून कार कोसळून दोन ठार, एक जखमी

अमृता चौगुले

संगमनेर (अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट महामार्गावरील उड्डानपुलाचा कठड्याला तोडून खाली कोसळली. या भीषण अपघातात कारमधील  दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. ही घटना हिवरगाव पावसा येथील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि.२०) सायंकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली. प्रथमेश विकास कुरकुटे (वय 22, रा. कुरकुटवाडी) आणि अभिषेक साहेबराव रहाणे (वय 30, रा. चंदनपुरी) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथील रहिवासी असणारा प्रथमेश विकास कुरकुटे, पोखरी बाळेश्वर येथील रहिवासी असणारा विजय काळे तसेच चंदनापुरी येथील रहिवासी असणारा अभिषेक साहेबराव रहाणे हे तिघेजण चंदनापुरीहुन नातेवाईकांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी घुलेवाडी येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाने जात होते. दरम्यान यांची कार हिवरगाव पावसातील महामार्गाच्याउड्डाण पुलावर आली असता अचानक कार चालवणाऱ्याचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे कार पुलाचे कठडे तोडून थेट खाली कोसळले. या भीषण अपघातात प्रथमेश कुरकुटे हा जागेवर ठार झाला तर अभिषेक साहेबराव रहाणे याचा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला. तसेच तिसरा व्यक्ती विजय काळे सध्या गंभीरित्या जखमी असून त्याच्यावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

SCROLL FOR NEXT