जामखेड: पुढारी वृत्तसेवा; जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर (ता.जामखेड) या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे याच्यावर विनयभंगाचे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान त्यांनी संस्थेतील विद्यार्थी मुले व मुली यांच्यावर अत्याचार, अर्थिक, मानसिक छळवणूक केल्याचे आरोप आहेत. त्याच्या निषेधार्थ व डॉ. भास्कर मोरे या अद्याप अटक करण्यात आली नाही; या विरोधात बुधवारी (दि. 13) रोजी जामखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.
या घटनेच्या निषेधार्थ जामखेड येथील मेनरोड, खर्डा रोड, बीड रोड, तपनेश्वर रोड येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण शहर आणि रस्त्यावर शुकशुकाट होता. उपोषणकर्ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले, रत्नदीप संस्थेचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी जामखेड बंदची हाक दिली होती. त्यानुसार जामखेड शहर, ग्रामस्थाकडून आज १००% बंद पाळण्यात आला. रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा बुधवारी नववा दिवस तर उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांच्या उपोषणाचा सातवा दिवस होता.
जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे याच्या विरोधात आठ दिवसापासून अंदोलन चालु आहे. आज अंदोलनाचा नववा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या अंदोलनानंतर डाॅ भास्कर मोरे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर हरीण पाळल्यामुळे वनविभागानेही गुन्हा दाखल केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ नाशिक या विद्यापीठ समिती यांनी प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. तसेच परिक्षा फॉर्म भरून घेतले जातील यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक मार्फत अहवाल मागीतला आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही. यामध्ये दुसऱ्या महाविद्यालयात समायोजन करणे, नोडल अधिकारी नियुक्त करणे, रत्नदीपची मान्यता रद्द करणे तसेच डॉ. मोरे वर गुन्हा दाखल होऊन, सहा दिवस झाले पण पोलिसांकडून अद्याप अटक झाली नाही. त्यामुळे आंदोलन चालूच राहीले आहे. आंदोलक विद्यार्थी व शिवप्रतिष्ठाण हिदुस्थान तसेच ग्रामस्थांच्या वतीने रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या उपोषणाला जाहीर पाठींबा देऊन पालक म्हणुन जामखेड शहर कडकडीत बंद पाळण्यात आले आहे . त्याला १००% प्रतिसाद मिळाला. बंदमुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते .