कोपरगाव पुढारी वृत्तसेवा : कासली येथील शेततळ्यात पाईप काढण्यासाठी गेला असताना पाय निसटून पडून विनोद नामदेव भागवत (वय ३५) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी पाच वाजणाच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. त्यांच्यामागे दोन मुली एक मुलगा आई-वडील एक भाऊ, असा परिवार आहे.
ओम गुरुदेव आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे सुधाकर मलिक यांचे ते आतेभाऊ होते. विनोद भागवत यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत विनोद यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून त्यांच्यावर गवंडगाव तालुका येवला येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.