अहमदनगर

तलाठी परीक्षेपासून कोणीही वंचित राहणार नाही : मंत्री विखे

अमृता चौगुले

शिर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तलाठी भरती परीक्षेपासून कोणताही परिक्षार्थी वंचित राहणार नाही, मात्र परीक्षार्थींना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच, यापुढील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच सुरळीत पार पडतील, आशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तलाठी भरती परीक्षेच्या दरम्यान टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पाहिल्या सत्रात सकाळी 9 वाजता परीक्षा होऊ शकली नाही.

यासंदर्भात टीसीएस कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परिक्षा उशीरा सुरु होण्याबाबत कळविण्यात आले. टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परिक्षा सकाळी अकरा वाजता राज्यातील 30 जिल्हे व 115 टीसीएस केंद्रांवर सुरु करण्यात आल्याचे महसूलमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी राज्य समन्वयक यांनी सर्व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करुन प्रथम सत्रातील विद्यार्थ्याना आणि त्याप्रमाणे सर्व परिक्षा केंद्रांवरील परिक्षार्थीना याची सूचना देण्यात आली होती, असे यावेळी मंत्री विखे पाटील यांनी बोलताना सांगितले. राज्यातील सर्व तलाठी भरतीसाठी होणार्‍या उर्वरीत दोनही सत्रातील परिक्षा नियोजीत वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरु झाल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी दिलगीरी व्यक्त केली. तसेच परीक्षार्थींना सर्व्हर डाउन तांत्रिक घटनेची महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्फत त्वरीत चौकशी करणार असल्याचे जाहीर केले. तसेच पुढील सर्व परीक्षा वेळापत्रकानुसार सुरळीत पाडण्यासाठी विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सर्व परीक्षार्थीं विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावे असा दिलासा मंत्री विखे पाटील यांनी दिला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT