अहमदनगर

आवास योजनेत जामखेड पंचायत समिती प्रथम

Laxman Dhenge

जामखेड : पुढारी वृतसेवा : अमृत महाआवास अभियान 3.0 स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये जामखेड पंचायत समितीने नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला. दोन वर्षांपासून जामखेड पंचायत समितीने घरकुल योजनेमध्ये आघाडी घेतल्याचे पाहायला मिळते. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी विविध उपक्रम राबवून तालुक्यातील घरकुले वेळेवर पूर्ण होतील, याकडे सातत्याने लक्ष दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, रोजगार सेवक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, आदींनी मेहनत घेऊन 97 टक्के घरे पूर्ण केली. याचे फलित म्हणून अमृत महाआवास अभियान 3.0 स्पर्धेमध्ये जामखेड पंचायत समितीने राज्य पुरस्कृत आवाज योजनेत नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला. अरणगाव ग्रामपंचायतीने राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नाशिक विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

तहसीलदार योगेश चंद्रे यानी गौण खनिजाबाबत वेळोवेळी मदत केल्याने काम अधिक सोपे झाले. तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच/सदस्य, सक्रिय कार्यकर्ते/सामाजिक कार्यकर्ते यांनीही घरकुल भेटी देताना अधिकारी/कर्मचार्‍यांना मोठी मदत केल्याचे पोळ यांनी सांगितले. खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांनीही प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले. या यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सहायक गटविकास अधिकारी कैलास खैरे, विस्तार अधिकारी बी. के. माने, शंकरराव गायकवाड, सिद्धनाथ भजनावळे, सुनील मिसाळ,सरपंच अंकुश शिंदे, ग्रामसेवक विनोद खुरंगुळे, सुजित पवार, रुपेश वाघमारे, संकेत पंचमुख, प्रीतम दीक्षित यांनी अभिनंदन केले.

यशाचे श्रेय निरनिराळ्या आघाड्यांना : पोळ

गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी यशाचे श्रेय देताना केवळ स्वतःपुरते सीमित न ठेवता लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी तालुक्यातील पत्रकार अशा विविध आघाड्यांवर काम करणार्‍या कर्मचार्‍चांबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले, त्यांना यशाचे श्रेय दिले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT