अहमदनगर

रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव ; ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

अमृता चौगुले

 पुढारी वृत्तसेवा :  सध्या थंडीचे दिवस असताना ढगाळ वातावरण तयार झाले असून, रब्बी पिकांवर रोग पडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. खरीप पिके पावसाभावी वाया गेल्यामुळे रब्बी पिकांवर शेतकर्‍यांची मदार अवलंबून आहे. थोड्याफार पावसावर गहू, हरभरा, ज्वारीची पेरणी आली. ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, तूर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांची पाने पिवळी पडली असून, अळी तयार झाली आहे. पिकांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो. गेल्या आठ दिवसांपासून प्रखर सूर्यप्रकाश पडला नाही. त्यामुळे पिवळी पडलेल्या पिकांवर फवारणी करण्याची वेळ आली आहे. फवारणी करण्यासाठी शेतकर्‍यांना मोठा आर्थिक खर्च येत असल्याने रब्बीची पिकेही धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

तूर, हरभरा ही पिके शेतकर्‍यांना रब्बीचे उत्पन्न मिळवून देतात. तुरीचे पीक चांगले बहरले असून रोगाने त्यावर अतिक्रमण केले आहे. तूर खूप वाढत असल्याने फवारणी मारणे जास्त शक्य नसते. परिणामी शेतकरी फवारणी करणे टाळतात. त्यामुळे उत्पन्न क्षमता कमी होते. हरभरा पिकावर पडलेला रोग उत्पन्नावर परिणाम करणार आहे. अवकाळी पावसाने संकट येण्याची चिन्हे असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

मका भिजण्याची भीती
मक्याची कणसे अजून तशीच पडलेली असून पावसामुळे त्यांना सुद्धा धोका निर्माण होणार आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे रब्बीची पिके धोक्यात सापडली आहेत. हरभरा पिकावर रोग पडला असून पाने पिवळी पडली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT