file photo  
अहमदनगर

नगर : ग्रामपंचायत सदस्याचे घर पेटविले

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य निसारभाई सय्यद यांच्या घराजवळ अज्ञात समाजकंटकांनी एकत्र येत जाळपोळ केली. घर पेटवून देण्याच्या उद्देशाने घरामध्ये प्लास्टीक पिशवीमध्ये भरून आणलेले पेट्रोल फेकत घोषणाबाजी करण्यात आली. घराबाहेर लावलेल्या दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून आग लावण्यात आली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांदूळवाडी (ता. राहुरी) येथे शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या सात जणांनी पत्रकार सय्यद यांच्या घरासमोर राडा घातला. हातामध्ये दांडके घेऊन समाजकंटकांनी घराबाहेरील उभ्या असलेल्या मारूती कंपनीच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. घराबाहेर 'या तुम्हाला जाळून टाकू' असे सांगत संबंधितांनी चारचाकी वाहनांना आग लावली. त्यानंतर घोषणाबाजी करीत आरोपींनी प्लास्टीक पिशवीमध्ये आणलेले पेट्रोल घरावर शिंपडले. पेट्रोलने भरलेले पिशव्या व कापड बोळे फेकत घरातील लहानग्या मुलांसह 10 ते 12 जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. वाहने पेटत असताना आरोपी रस्त्याकडे गेले. सय्यद कुटुंबियांनी पाणी आणत आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. काही काळाने पुन्हा संबंधित आरोपींनी रस्त्यावर येत जातीवाचक शिविगाळ केली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT