अहमदनगर

कोपरगाव : खूनप्रकरणी चार आरोपींना केले जेरबंद

अमृता चौगुले

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  गवंडी कामाचे राहिलेले मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चार आरोपींनी दगड दांड्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या बाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 11 रोजी येसगाव (ता. कोपरगाव) येथील कमानी जवळ दिपक दादा गांगुर्डे (वय 40, रा. अचानक नगर, येसगाव ता. कोपरगाव) यास उषा सुनिल पोळ, स्नेहा सुनिल पोळ, राज उर्फ बबलु सुनिल पोळ, आण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड (सर्व रा. येसगाव ता. कोपरगाव) यांनी गवंडी कामाचे मजुरीचे राहिलेले पैसे मागितलेच्या कारणावरुन दिपक दादा गांगुर्डे यास लाथाबुक्यानी दगडाने माराहण केली होती.

या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी अत्यंत तातडीने घटनास्थळी पोहचून आरोपींचे शोध कामी पोलिस पथक तयार करून आरोपींचा शोध घेत असताना, देसले यांना गोपनिय बातमी मिळाली की, सदरचे आरोपी हे स्मशाभुमीचे जवळ, झाडामध्ये लपुन बसलेले आहेत. त्यानुसार पोलिसांनीि परीसर पिंजून काढून सर्व आरोपींना शिताफीने तासाभरात पकडले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT