अहमदनगर

नगर : शहरात 45 ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमण

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील 45 ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमण झाले असून, त्यामुळे पावसाळ्यात नागरिकाच्या घरात पाणी शिरते. ओढे-नाले तातडीने खुले करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी येत्या 21 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापनची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ठोस निर्णय झाल्यास ओढ्या-नाल्यांचा प्रश्न मार्गी निघण्याची शक्यता आहे. शहरातील ओढे-नाले खुले करण्यासंदर्भात मनपाकडून हलगर्जीपणा होत असल्याच्या पार्श्वभूमिवर सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चेंगडे यांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.

निवासी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन ओढ्या-नाल्यांचा विषय मांडला. तर, त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. शहरातील ओढ्या-नाल्यांमुळे शहरातील नागरिकांचे जीवनमान धोक्यात आले आहे. येत्या पावसाळ्यात ओढे-नाले मोकळे न केल्यास आपत्तीचे संकट येण्याची शक्यता आहे, असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने बैठक बोलावली असून, येत्या 21 एप्रिल रोजी बैठकर पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी ओढ्या-नाल्यांच्या विषयाची अद्यायावत टिपणी जिल्हाधिकारी यांना सादर करण्याचे आदेशही महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT