अहमदनगर

राहुरी : लग्न पडलं महागात ! लाखभर रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन नववधूचा पोबारा

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्यातील उंबरे येथे पाच ते सहा दिवसांपूर्वी विवाह करून आलेल्या नवविवाहित तरुणीने दुसर्‍याच दिवशी सुमारे लाखभर रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची उंबरे परिसरात प्रचंड चर्चा सुरू आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथील एका मध्यस्थीने सुमारे एक लाख रूपये कमीशन घेऊन उंबरे गावातील एका तरुणाचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एका तरुणीशी पाच ते सहा दिवसांपूर्वी लावून दिला होता. नववधूला विवाह सोहळ्यात सुमारे लाखभर रूपयांचे सोन्याचे दागीने वराकडून घालण्यात आले होते.

सदर विवाह हा हिंदू पद्धतीने मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता. विवाह सोहळ्यात वर्‍हाडी मंडळींना पाचीपक्वान्नाचे मिष्ठान भोजन देण्यात आले. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर नववधू ही वराच्या घरी म्हणजे उंबरे या ठिकाणी आली. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी वधू व वर दोघे उंबरे परिसरातील काही मंदिरात गेले आणि जोडीने देव दर्शन घेतले. दर्शन करुन घरी परतले. त्याच दिवशी सायंकाळच्या दरम्यान नववधू ही वराच्या घरातून पसार झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT