अकोले : पुढारी वृत्तसेवा : अकोले तहसील कार्यालयात तहसीलदार सतिश थेटे उपस्थित राहत नसेल तर ही खेदजनक बाब आहे. जनतेला कामासाठी तीन चार चकरा माराव्या लागत आहे. काम असताना पहिल जनता मग इतर कामाचा कारभार चालायला पाहिजे. कामात हलगर्जीपणा केल्यास मला विधान भवनाच्या पायर्यावर उपोषणाला बसाव लागेल, असा इशारा आ.डॉ. किरण लहामटे यांनी दिला. अकोले तहसीलदार कार्यालयात आ.डॉ. किरण लहामटे यांनी अचानक भेट दिल्यावर अकोले पोलिस ठाणे व तहसील कार्यालयाच्या परिसरात अस्वच्छता असल्याने पोलिस व महसूल विभागाच्या कर्मचार्या चेहर्यावर स्वच्छतेबाबतं कान टोचले.
तहसील कार्यालयात तहसीलदार सतीश थेटे नसल्याने नायब तहसीलदार ठकाजी महालेंची 'तु- तु मै मै होत' रखडलेल्या पीक पाहणी, उतारावर नोंदी, आर्थिकदृष्ट्या मागास प्रमाणपत्र, शेतकरी दाखले, अल्पभूधारक राष्ट्रीयत्व, भूमिहीन महिला आरक्षण प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका वारसापत्राची कामे रखडल्याचे वास्तव समोर आले. ग्रामस्थ व तहसील कार्यालयातील कर्मचार्यांमधून तहसीलदार सतिश थेटे शुक्रवारी लवकर जातात. सोमवारी दुपारी येतात, अशी धक्कादायक माहिती समोर येताच आ.डॉ. लहामटे म्हणाले की, शनिवार, रविवारी काही आपत्कालीन घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार? तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची बाबं खेदजनक आहे.
अकोले तालुका अतिदुर्गम आहे. तालुक्यातून कामासाठी येणार्यांना चकरा मारायला लावू नका, नाहीतर तुमच्या पगारातून चकरा मारण्यासाठी भाड्याचे पैसे द्या. तसेच कामात सुधारणा करा आणि फेरवाटप, रेशनकार्ड, रस्त्याची प्रकरणे मध्ये दिरंगाई होत आहे. काम असताना पहिले जनता नंतर इतर काही कामांचा कारभार चालायला पाहिजे, पण इथे प्रशासनाची थाप घ्यायची म्हणजे मिटींगला उपस्थितीत राहत छान छान असा प्रकार दिसतोय. कामात हलगर्जीपणाचा हा प्रकार चालून घेतला जाणार नाही.
तात्कालीन तहसीलदार कांबळे यांच्या नावावर अनेक रस्त्याचे प्रकरणे प्रलंबित असल्याचे भासवून मागच्या अधिकार्यांच्या नावावर बोटे मोडणार व खडे फोडणे योग्य नाही. सरकारी कामात हलगर्जीपणा करणार्याची गय केली जाणार नसल्याचा सज्जड दम तहसील कार्यालयाच्या झाडाझडतीत आ. डॉ. किरण लहामटे यांनी दिला. यावेळी निवासी नायब तहसीलदार ठकाजी महाले, नायब तहसीलदार गणेश माळवे, नायब तहसीलदार सुधिर उंबाळे, नायब तहसीलदार दत्ता वाघ, जयवंत भांगरे, दत्तु कोल्हाळ, गणेश मंडलिक,सोमनाथ किरवे आदि उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे सरकार असताना अधिकार्यांवर वचक होता. आता अधिकार्यांवर सरकारचा अंकुश राहिला नाही. त्यामुळे अधिकार्यांमध्ये मुजोरी आल्याचे दिसत आहे. सर्व अधिकार्यांना सांगू इच्छितो की, अकोले तालुका हा वेगळ्या विचारसरणीचा आहे. तसेच क्रांतिकारी तालुक्यात वेगळं काही खपवून घेतलं जाणार नाही, असे झाल्यास मला विधानभवनाच्या पायर्यावर उपोषणाला बसावं लागणार आहे.
– आ. डॉ. किरण लहामटे